कांदा पीक लागवड आणि नियोजन
कांदा हे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.00 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा ही जिल्हे कांदा पिकासाठी प्रसिध्द आहेत. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे.
हवामान
कांदा हिवाळी आणि उन्हाळी हंगामातील पिक असून महाराष्ट्रात पावसाळी आणि उन्हाळी अशी दोन पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.
जमीन
पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली आहे.
लागवड पुर्वमशागत
जमीनीची आडवी आणि उभी नांगरणी करून कुळवाचे दोन पाळया टाकून ढेकळे फोडून जमिन भूसभुशित करावी. जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.
कांदा लागवड केव्हा करावी
महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर या महिन्यात करतात. तसेच रब्बी हंगामात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात लागवड करतात.
बियाणे
कांदा रोप तयार करण्यासाठी कांद्याचे 10 किलो बियाणे आवश्यक असते.
लागवड
कांदा रोप टाकण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करून कुलवाच्या पाळया टाकून जमीन भुसभुसित करावी. 3 ते 4 मीटर लांबीच्या गादीवाफ्यावर रोप टाकावे.
हलके पाणी घालावे. बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाणी द्यावे. रोपांना गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्य समजावे. खरीप कांदयाचे रोप तयार होण्यास 6 ते 7 आठवडे तर रब्बीचे रोप तयार होण्यास 8 ते 9 आठवडे लागतात.
रोपे काढण्यापूर्वी 1 दिवस अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे. कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्यावर करता येते. सपाट वाफयामध्ये कांद्याचे उत्पादन अधिक मिळते. सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. लागवडीस सकाळी अथवा संध्याकाळी पाणी द्यावे
खते व पाणी व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे. त्यानंतर 1 महिन्याने 50 किलो पालाश आणि 10 किलो सिलिकॉन प्रति हेक्टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे.
आंतरमशागत
रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी 3 आठवडयांअगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो.
रोग व कीड
कांदयावर प्रमुख रोग म्हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल् यासारखी दिसतात. खरीप कांदयावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळया हेक्टरी अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्टभागात खरडतात. व त्यात स्त्रवणारा रस शोषतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.
उपाय
फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पुनर्लाण केल्यानंतर दोन तीन आठवडयांनी प्रती हेक्टरी फॉस्फॉमिडॉन 85 डब्ल्यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू एस.सी. 550 मिली अधिक डायथेन एम 45, 75 डब्ल्यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायथेन झेड – 78, 75 डब्ल्यू डी पी 1000 ग्रॅम अधक 500 ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्य 500 लिटर पाण्यात मिसळून पाहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्या वेळी प्रती हेक्टरी फॉस्फोमिडॉन 85 डब्ल्यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू. एस.सी. 550 मिली अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड 50 डब्ल्यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्ल्यू.डी. पी. 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
काढणी व उत्पादन
हे पण वाचा